नेपाळमध्ये शवागार पडले कमी; सरकारी कार्यालयात ठेवले मृतदेह
नेपाळमध्ये शवागार पडले कमी; सरकारी कार्यालयात ठेवले मृतदेह
Published
नेपाळमधील चितवन जिल्ह्याला 26 ऑगस्टला आलेल्या भीषण पुराचा थेट फटका बसला नाही. मात्र, शेजारील नदीतून वाहून आलेल्या जवळपास 300 मृतदेहांमुळे हा जिल्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
नेपाळमधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चितवनमध्ये सर्वाधिक मृतदेह आढळले आहेत.
या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना स्थानिक नागरिक आणि प्रशासन कशा पद्धतीने करत आहेत, हे पाहण्यासाठी बीबीसीची टीम चितवनमध्ये पोहोचली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






